शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहे, समाज मंदिरे संस्थांना भाडेतत्त्वावर : शासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:06 IST

कोल्हापूर : आमदार निधीतून बांधण्यात आलेली समाज मंदिरे, सामजिक सभागृहे, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना

ठळक मुद्देभाडे ठरविण्यासाठी समितीची नेमणूक

 समीर देशपांडे ।कोल्हापूर : आमदार निधीतून बांधण्यात आलेली समाज मंदिरे, सामजिक सभागृहे, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना करणे शक्य नसल्यास या इमारती सामाजिक संस्थांना भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे.

विविध संस्था, संघटना, ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार गेली अनेक वर्षे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी या मालमत्ता उभारण्यासाठी निधी दिला आहे. सुरुवातीला उत्साहाने विविध समाजांनी सांस्कृतिक सभागृहे बांधून घेतली. अनेक ग्रामपंचायती, नगर परिषदांनी व्यायामशाळा बांधल्या. समाज मंदिरे बांधण्यात आली; परंतु नंतर नंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदांना या सर्व इमारतींचा दुरुस्ती आणि देखभाल यांचा खर्च झेपेनासा झाला.

यावर उपाय म्हणून शासनाने आता अशा इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती जर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना करणे शक्य नसेल, तर या इमारती सामाजिक नोंदणीकृत संस्थांना भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. मात्र, याची मालकी शासनाचीच राहणार आहे. ज्या इमारती भाडे तत्त्वावर द्यावयाच्या आहेत, अशा इमारतींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. स्थानिक प्रसिद्धीही द्यावी आणि सामाजिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार या इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीसाठी संस्थांची नियुक्ती करावी, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. भाडे ठरविण्यासाठी आणि संस्था निवडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन अधिकारी या समितीचे सचिव असतील.सामाजिक संस्थांना अटीज्या सामाजिक संस्थांना इमारती देखभाल आणि दुरुस्तीसाठी देण्यात येणार आहेत, त्यांना कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही. त्यांनी सार्वजनिक कामासाठीच इमारतींचा वापर करावयाचा आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर जिल्हाधिकाºयांनी विहित केलेला फलक लावावा लागेल. तसेच वाढीव बांधकाम करता येणार नाही. तीन वर्षांसाठी हा करार करण्यात येईल.या संस्था राहतील पात्रमुंबई विश्वस्त अधिनियम १९५0 किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६0 या नियमाखाली संस्था नोंदणीकृती असावी. तीन वर्षांचे लेखापरीक्षण असावे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर संस्था कार्यरत असावी आणि संस्थेच्या सभासदांवर फौजदारी न्यायालयात गुन्हे सिद्ध झालेले नसावेत, अशा संस्था यासाठी पात्र राहणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला आहे. अनेक गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबविणाºया संस्था आहेत. तसेच अशा पद्धतीच्या अनेक इमारतीही विनावापर पडून आहेत. संस्थेला इमारत मिळेल आणि इमारतींची देखभालही होईल. सार्वजनिक पैसा या इमारतींवर खर्च झाल्याने त्या पडून राहण्यापेक्षा वापरात येण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.अ‍ॅड. हेमंत कोलेकर, जिल्हा परिषद सदस्य, नेसरी, ता. गडहिंलज